Ad will apear here
Next
मसूरची संज्योत
‘सामन्यात’ ‘असामान्यत्व’ आढळणारे व्यक्तिमत्त्व असलेले र. वि. उर्फ राघूअण्णा लिमये म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील राजकीय चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांची कन्या आशा लिमये यांनी ‘मसूरची संज्योत’मधून अण्णांचे जीवनचित्रण केले आहे. लिमये यांच्या जडणघडणीत त्यांच्या आईचा खूप मोठा वाटा होता. म्हणूनच लेखिकेने आजीबद्दल आधी सांगत वडिलांच्या बालपणीच्या व विद्यार्थीदशेतील आठवणी सांगितल्या आहेत.

स्पष्टवक्तेपणा, सत्याची कास धरणे, तल्लख बुद्धी, अभ्यासू वृत्ती, पहाडी आवाज ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. देशात धार्मिक, राजकीय, शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याची त्यांना तळमळ होती. सुधारणेबरोबरच जनतेत देशप्रेम निर्माण करणे, पुढारी निर्माण करणे या विचाराने त्यांनी राष्ट्रकार्यास वाहून घेतले. मसूर या मूळ गावी अण्णांचे काम जास्त झाले. स्वातंत्र्यसंग्रामातील सहभाग राष्ट्रसेवा दलातील कार्य या संबंधाची माहिती देताना आई-वडिलांचे नाते, कौटुंबिक अण्णा, रसिक कलावंत, जवळचे मित्र यातून राघुअण्णा लिमयांचे चरित्र समोर ठेवले आहे. महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाच अंगीकार त्यांनी जीवनात कसा केला, हेही लेखिकेने सांगितले आहे.  
      
प्रकाशन : मायमिरर पब्लिशिंग हाउस
पृष्ठे : ११२
मूल्य : ९५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZUXBU
Similar Posts
५२ लेसन्स फॉर लाइफ ‘तुम्हाला तुमच्या नशिबाने गोडऐवजी लिंबासारखं आम्ब्वत फळ दिलं, तर तक्रार करू नका. त्या लिंबापासून स्वादिष्ट असं सरबत बनवा आणि तहानेने व्याकूळ झालेल्यांची तहान भागवा’, नेपोलियन हिल यांचा हा संदेश सर्वांनीच कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे. ज्युडिथ विडीअमसन यांनी हिल यांनी सांगितलेले जगण्याचे नियम सांगून त्यांचे विश्लेषण केले आहे
‘पानगळ’ : मनाला चक्रावून टाकणारं अद्भुत कोडं हृषीकेश गुप्ते या लेखकाच्या लांब पल्ल्याच्या गूढ कथा कायमच व्यक्ती आणि त्यांच्या भावनावलयांना शब्दबद्ध करू पाहतात. आदिम जाणिवा, मूलभूत गरजा-भावना, डोकं चक्रावून टाकणारी कोडंसदृश मांडणी आणि ठराविक टप्प्यांवर वाचकाला बसणारे जबरदस्त धक्के या सर्वांतून जन्म घेणाऱ्या या कथा असतात. याच प्रकारच्या घटक तत्त्वांचा
कलायडोस्कोप व्यावसायिक कामासाठी जगभर फिरताना विविध अनुभव डॉ. प्रसाद मोडक यांना आले. वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या व्यक्ती भेटल्या, या अनुभवावर त्यांनी ब्लॉगवर लेखन केले. यातील ४० लेखांचा संग्रह त्यांनी ‘कलायडोस्कोप’मधून वाचकांपुढे सादर केला आहे.
ही व्यवस्था काय आहे? गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषयांवर राजीव कालेलकर यांनी केलेले विचारप्रवृत्त करणारे हे लेखन. या पुस्तकातील लेखांमध्ये अपंगत्व, दलित, स्त्रीप्रश्न, मैत्री, संगीत, मार्क्सवाद, संस्कृती इत्यादींवर भाष्य केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language